Skip to main content

Posts

Showing posts with the label सुंठवडा
वाफाळता श्रावण श्रावण म्हणजे ऊनपावसाचा खेळ. वारंवार बदलणारं वातावरण आणि त्यासोबत येणारे आजार. एकंदर श्रावणातले हे वातावरण रोग निर्माण करणाऱ्या सूक्ष्म जंतूसाठी पोषक असते म्हणून या दिवसात साथीचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. आयुर्वेदानुसार प्रत्येक आजारात शरीरातील अग्नि म्हणजे पचनशक्ती कमी होते. म्हणूनच श्रावणात उपवासाचे महत्त्व आहे. आयुर्वेदानुसार उपवास कसा करायचा हे आपण मागच्या ‘नमस्ते लंघन’ या लेखात पाहिले. वाचकांपैकी बरेच जण त्यापद्धतीने श्रावण पाळून आरोग्य आणि पुण्य दोन्ही मिळवत असतील अशी आशा बाळगतो. श्रावण आणि डोंबिवली फास्ट उपवास आणि व्रत वैकल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रावणापासून हिंदूंचे असंख्य सण सुरु होतात. मला स्वतःला श्रावण महिना हा डोंबिवली स्टेशनवर येणाऱ्या लोकलसारखा वाटतो. टिटवाळा, बदलापूर, कर्जत, कसारा कुठूनही येणारी लोकल कितीही रिकामी असू दे; ती डोंबिवलीत आली की खचाखच भरतेच. शेल्फमधून पडणारी पुस्तकं जशी धडाधड कोसळतात तसेच प्ल ॅ टफ ॉ र्मवरचे डोंबिवलीकर लोकलमध्ये चढतात. याचप्रकारे श्रावणात एकामागून एक सण धडाधड येत जातात. दीप आमावास्येपाठोपाठ सुरु ...