Skip to main content

Posts

Showing posts with the label Noble prize 2016
नमस्ते लंघन काही वर्षांपूर्वी अक्षयकुमार आणि कतरिना कैफ यांनी प्रमुख भूमिका केलेला ‘ नमस्ते लंडन ’ हा पिक्चर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ' मैं जहाँ रहूँ ' हे राहत फतेह अली खानने गायलेले अप्रतिम गाणे अनेकांच्या मोबाईलमध्ये अजूनही असेल. या पिक्चरमध्ये अक्षयकुमार मूळ भारतीय असलेल्या, बालपणापासून लंडनमध्ये वाढलेल्या कतरिनाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो . त्याचप्रकारे भारतीय संकृतीचा अविभाज्य भाग असलेल्या उपवासाची शात्रोक्त माहिती या लेखात आपण बघणार आहोत. श्रावणमासी – हर्ष मानसी श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा महिना. परवा पहिला श्रावणी सोमवार. अनेकांचा उपवास असेल. उपवास म्हणजे साबुदाणा , बटाटा , रताळे यासारखे पचायला जड पदार्थ खाणे. सोमवारचा उपवास शंकरासाठी करतात पण ह्या उपवासाने ॲ सिडिटी होऊन डोके दुखू लागले की उपवास करणाऱ्या व्यक्तीचंच तांडव सुरु होतं आणि डॉक्टरांकडे धावाधाव करावी लागते. मुळात उपवासाचे म्हणून खाल्ले जाणारे हे पदार्थ परदेशी आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहीतही नसेल. मग खरा उपवास असतो तरी कसा ? उपवास हा शब्द उप + वास या दोन...