Skip to main content

Posts

Showing posts with the label Rainy season
                                  लोणचे खा पण बदनामीपुरते अखेर ज्या अस्सल मुंबईच्या पावसाची आपण इतके दिवस वाट पाहत होतो तो एकदाचा आलाय. शेतकऱ्यासोबत वेधाशाळेवाल्यांचाही जीव भांड्यात पडलाय. आता सलग दोन दोन दिवस तो कोसळत राहणार. कधी कधी तर ढग इतके दाटून येतात की दिवस आहे की रात्र हा प्रश्न पडतो. या वातावरणात आपला अंगभूत आळस अजूनच वाढतो आणि मस्तपैकी झोपून रहावस वाटतं. या अशा ‘टिपिकल’ पावसाळी वातावरणात पोटाची मात्र पार वाट लागते. अशा वेळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना भूक लागलेली आहे की नाही हेच समजत नाही. आणि समजा काही खाल्लंच तर पोट जड होणे, पोट फुगणे अशी लक्षणं सुरु होतात तर काही जणांना जुलाब लागतात. म्हणून अशा वेळी काय खावं तरी काय?  आयुर्वेदानुसार सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो त्यामुळे आपल्या शरीरातील पचवण्याची क्षमता (अग्नि) कमी होतो आणि वात वाढतो. म्हणून अशा दिवशी अग्निला वाढवणारा आणि वात कमी करणारा आहार घ्यायला हवा. म्हणजे नेमकं काय खायचं याचं उत्तर चरक संहितेत म...