Skip to main content

Posts

Showing posts with the label 50 peoples who could save the planet
मागच्या दोन लेखात उपवास आणि सण ही श्रावण महिन्याची दोन वैशिष्ट्ये आपण पाहिली. श्रावण संपता संपता श्रावणात केला जाणारा अजून एक उपक्रम पाहूया तो म्हणजे सत्यनारायणाची पूजा. हा विषय सध्या कमालीचा वादग्रस्त ठरला आहे म्हणून जपून बोलयला हवे. मी अनुभवलेल्या अशाच  एका ‘सत्यनारायणाची सत्यकथा’. सत्यनारायणाची सत्यकथा आटपाट नगर होतं; सॉरी चुकलो खड्ड्यांनी सुशोभित असं एक नगर होतं. त्याचं नाव डोंबिवली. या नगरात डॉ. वाघ नावाचे एक डॉक्टर होते. रविवारी एका पेशंटने त्यांना सत्यनारायणाच्या प्रसादासाठी बोलावलं. सायंकाळी सांगितलेल्या वेळी डॉक्टर वाघ तिथे पोचले; देवाला रीतसर नमस्कार केला. कुणी आपल्याकडे पाहत नाहीये याची काळजी घेऊन ‘आठवणीने खिशात घालून आणलेली’ दहाची नोट त्यांनी देवासमोर ठेवली आणि “उद्या भरपूर पेशंट येऊ देत” अशी मनोभावे प्रार्थना केली. प्रसादासाठी हात पुढे केला आणि घात झाला. डार्क ब्राऊन कलरचा चिकट पदार्थ त्यांच्या हातावर पडला. डॉ. वाघ – काय आहे हे ? यजमान – ओळखा पाहू ? डॉ. वाघ – नाही बुवा ओळखता येत. यजमान – वाटलंच होतं मला. “च ॉ कलेट फ्लेवर्ड पंचामृत” आमच्...